Tuesday, September 30, 2008

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन………………..म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

धावत धावत जाऊन माझ्या
रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात
राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत
पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मघली सुट्टी होताच वाटरबॅग सोङुन,
नळाखाली हात धरुन पानी प्यायचय,
कसाबसा ङबा संपवत.. तीखट मीट लावलेल्या,
चींचा-बोर-पेरु-काकङी सागळ खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंम्प धरुन,
खोङ रबर आणि पाटीने क्रीकेट खेळायचय,
उद्या पाउस पङुन शाळेला
सुट्टी मिळेल का,
हा विचार करत राञी झोपी जायचय,
अनपेक्षीत सुट्टीच्या आनंदासाटी....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धंटा व्हायची वाट बधत का आसेना,
मीञांशी गप्पा मारत
वर्गा‍‍‍‍‍‍‍‍‍त बसायचय,
धंटा होताच मीञांच कोंङाळं करुन,
सायकलची रेस लाऊनच घरी पोहचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपनातल्या,
दोन तारामधुन निघुन बाहेर पाळयचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला.....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

Sunday, September 21, 2008

आयुष्य असचं जगायचं असतं

घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


आयुष्य असचं जगायचं असतं...........

........................ '' कणा ''......................

........................ '' कणा ''......................

ओळखळत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते करदमलेले, केसावर्ती पाणी

क्षण भर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशीन पोरिसरखी, चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होतो नव्हते ते गेले
प्रसाद म्हणून पापण्यान मधे पाणी थोडे ठेवले

कारभरणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे
पडकी भिंत बंधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा

Friday, September 19, 2008

While a man was polishing his new car, his 4 yr old son picked stone & scratched lines on the side of the car.

In anger, the man took the child's hand & hit it many times, not realizing he was using a wrench.

At the hospital, the child lost all his fingers due to multiple fractures. When the child saw his father....
with painful eyes he asked 'Dad when will my fingers grow back?'

Man was so hurt and speechless. He went back to car and kicked it a lot of times.
Devastated by his own actions...... sitting in front of that car he looked at the scratches, child had written 'LOVE YOU DAD'.
The next day that man committed suicide. . .

Anger and Love have no limits, Choose the later to have a beautiful & lovely life....

Things are to be used and people are to be loved,
But the problem in todays world is that,
People are used and things are loved

Thursday, September 18, 2008

माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

कॉलेज

कॉलेज कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती

क्षण......

क्षण......
क्षणांवर जगतो आपण,
कारण क्षण आयुष्य घडवतात,
आठवणीत रमतो आपण,
कारण क्षण आठवणी बनवतात......

क्षण... काही आनंदाचे,
तर काही खूप दुख:चे,
क्षण.... हास्य-विनोदाचे,
तर काही फक्त रडण्याचे.......

क्षण असतात मैत्रीचे,
क्षण असतात प्रेमाचे,
क्षण असतात मायचे,
अन् आपण जोपासलेल्या नात्यांचेही.......

क्षणात येते दाटून भीती,
क्षणात सारे बळही येते,
येती कधी क्षण सोबतीचे,
तर कधी येती एकाकी क्षण.......

समाधान मिळते क्षणात एका,
वादळही उतते पुढल्या क्षणी,
वाटे हक्क मात्र ज्या क्षणावर,
तेव्हा काळ उभा ठाकतो समोर........
काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....! .....................
मेंदूचा वापर

परवाच कुठेतरी वाचले आपण आपल्या मेंदूंचा १० टक्केच भाग वापरतो, उरलेला ९० टक्के भाग आपण कधी वापरतच नाही. मी याला २००% विरोध करतो. कारण मी एक (एकाच) अशा व्यक्तीला ओळखतो जी या वाक्याला अपवाद आहे. खरंच. तुमचा विश्वास बसणार नाही. आधी मालाही माहीत नव्हते, मग एके दिवशी अचानक कळले की काही माणसे (माफ करा मी वर एकच म्हणालो ते लगेच विसरलो.) ती व्यक्ती आपल्या मेंदूंचा ९० टक्केच भाग वापरते आणि उरलेला १० टक्के भाग वापरत नाही.

मग मी (बापडा) विचार करू लागलो की ती व्यक्ती (जगातील एकमेव) आपल्या मेंदूचा ९० टक्के भाग वापरते खरं. पण नक्की या ९० टक्के भागाचा वापर तरी कशासाठी करते?

भरपूर तास, कित्येक मिनिटे, शेकडो सेकंद आणि अनेक महिने अभ्यास केल्यानंतर मला कळले की ती व्यक्ती आपल्या मेंदूचा ९० टक्के भागाचा वापर हा विचार करण्यासाठी वापरते. झालं! आता इथे परत प्रश्न निर्माण झाला तो ती व्यक्ती मग नक्की विचार कसला करीत असेल? मग पुन्हा भरपूर तास, कित्येक मिनिटे, शेकडो सेकंद आणि अनेक महिने अभ्यास केल्यानंतर मला कळले की ती व्यक्ती आपल्या मेंदूचा ९० टक्के भागाचा हा उरलेले १० टक्के भाग का वापरत नाही याचा विचार करण्या
माझ प्रेम तुला कळायला हव होत
माझ प्रेम तुला कळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत

तु हसतेस आज माझ्यावर
आणि मी आसवानी भिजलेला
दोन थेम्ब पाणी
तुझ्याहि डोळ्यातुन गळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत


दिल होतस वचन तु
मला सात्त जन्माच्या सोबतिच
निदान सात पावल तरी
तु माझ्यासोबत चालायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...

लावुन गेलिस आग
आता ही विझवनार कोन
माझ्यासारख थोडस
तुही जळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...
तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा...
तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा...

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा´---------


मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारख असायला हवे.
त्याची कितीही ज़ाळी झाली तरी पण ते
जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपुन ठेवायला हवे.

कशावरही प्रेम कर . . . .

कशावरही प्रेम कर . . . .
कशावरही प्रेम कर . . . .

कशावरही प्रेम कर
पण मुलीवर कधी करु नकोस ,

ती पण तुझ्यावर प्रेम करेल ,
अशी खोटी आशा धरु नकोस .......

अनेक जण सांगतील तुला की ,
प्रेमात कधी हरु नकोस ..

पण मी सांगतो " हर " ,
स्वत:ची फ़सवणुक करु नकोस ....

ह्र्दय सगळ्यांचच धड्धड्तं ,
त्याला वेड्या प्रेम समजु नकोस ,

जास्तच धड्धड्लं , तर डॉक्टरकडे जा ,
पण मुलीकडे कधी जाऊ नकोस........
गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता.

2. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो.

3. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात.

4. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो.

5. गर्लफ्रेंडच नसल्याने तिने 'डिच' करण्याचा प्रश्न् उरत नाही.

6. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते, याचा साक्षात्कार होईल.

7. तुमच्यासाठी चांगले-वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल.

8. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही (उदाहरणार्थ आई, बाबा, बहीण, भाऊ) भेटवस्तू घेऊ शकाल.

9. प्रेमपत्र-सत्र थांबल्याने कागद वाचेल, त्यामुळे काही झाडे वाचतील.

10. रड्या प्रेमकथांऐवजी अक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.

11. थापांच्या पापातून सुटका होईल.

12. स्वप्नांचा 'व्यत्यय' संपल्याने झोप छान लागेल.

13. टेलिफोन बिल कमी तर होईलच, शिवाय ते सगळ्यांपासून लपवावे लागणार नाही
भिजली नदी, भिजले तळे,
भिजलेल्या आठवणींनी भिजले डोळे...

भिजलं शेत, भिजले मळे,
भिजलेल्या क्षणांचे आज भिजले सोहळे...



भिजली सर, भिजले थेंब,
भिजलेल्या भावनांमध्ये भिजलं प्रेम...

भिजलं फूल, भिजली पाकळी,
भिजलेल्या कपाळावर भिजली टिकली...

भिजली लाट, भिजली होडी,
भिजलेल्या ओठांची भिजली गोडी...

भिजलं पान, भिजली कळी,
भिजलेल्या गालावर भिजली खळी...

भिजलं गाणं, भिजली शीळ,
भिजलेल्या हणुवटीवर भिजलं तीळ...

भिजलं रान, भिजले वृक्ष,
भिजलेल्या हातांवर भिजले स्पर्श...

भिजली रात्र, भिजल्या चांदण्या,
भिजलेल्या नयनांच्या भिजल्या पापण्या...



भिजलं वादळ, भिजले वारे,
भिजलेल्या विरहात भिजले अंतरे...

भिजलं रक्त, भिजला काटा,
भिजलेल्या पाऊलांनी भिजल्या त्या वाटा...

भिजलं आभाळ, भिजले घन,
भिजलेल्या स्मृतींमध्ये भिजलं मन...

भिजलं जीवन, भिजलं आयुष्य,
भिजल्लेया भूतकाळानी भिजलं... भविष्य...
आजकाल हे मन माझं वेड्यासारखं वागतं,
विचारामध्ये त्याच्या हे रात्र रात्र जागतं ।
स्वत:शीच बोलता... स्वत:शीच हसतं
आठवणीमध्ये त्याच्या हे दिवसभ्रर रमतं ॥

बेधुंद होऊन त्याच्या संगे स्वप्नात हे नाचतं
नभीचे ते चंद्र तारे कवेत घेऊ पाहतं ।
कधी व्याकूळ होऊन त्याला साद घालतं
अन न थकता तास न तास वाट त्याची पाहतं॥

सांगा कोणी याला आता सारं काही संपले
फीर आता मागे वेड्या... ते विश्व नाही आपले ।
नकार देऊन त्याच्यापुरते प्रश्न त्याने मिटवले
अन एक ना उलगडणारे कोडे मात्र मला त्याने घातले ॥

तुटली आहे माळ अन विखुरले रे मोती
घरंगळली रेती... झाली मूठ माझी रिती ।।

सांगा ना हो याला...
म्हणावं विसरून जा ती नाती
मृगजळमागे धावताना येते निराशाच हाती...
येते निराशाच हाती....
एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं
मुलींचे नखरे सांगा पाहु.....

मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना......... प्लीजजजजजज....

2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........

ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!

चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस

Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......

पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......

मला वडापाव, कोल्ड कॉफ़ी, मिसळ, आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)

चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे

मैत्री करत असाल तर

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!

शेवटी एकच सांगू इच्छीतो की,
मैत्री करत असाल तर
नुसतेच मित्र म्हणुन Add करून ठेवू नका
किमान एक Scrap करून आपण या mitrachi आठवण ठेवा
वर्षामध्ये फक्त ३६५ दिवस असल्यामूळे शक्यतो मुले परीक्षेत नापास होतात.

आता बघुया एखाद्या मुलाचे शैक्षणिक वर्ष कसे जाते.

तुम्हाला माहित आहे तरीही लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात.


एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. आता रविवारी अभ्यास करणार की खेळणार. मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस.


उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस.


दररोज आपण ८ तास झोपतो. म्हणजे वर्षाला १३० दिवस झोपतो. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १४१ दिवस.


मुले रोज १ तास खेळतात. खेळल्याने मुलांची तब्येत सुधारते. अशा प्रकारे रोज १ तास म्हणजे वर्षाला १५ दिवस खेळतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १२६ दिवस.


दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. म्हणजेच वर्षाला एकुण ३० दिवस लागतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत ९६ दिवस.


दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे वर्षाला १५ दिवस लागतात. हे दिवस वजा केल्यास राहिलेत ८१ दिवस.


वर्षात
आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.


एक आनंदी पक्षी मी
उडतो आहे एकटाच नभी..

स्वछंदी आणि उनाड मी
भाव मनाचे मांडतो गाण्यातूनी..

गंभीर आणि उदात्त मी
बघतो या जगाला नभातूनी..

धुंद आणि बंधमुक्त मी
झोका खेळतो या फ़ांदीहून त्या फ़ांदीवरी..

धीट आणि साहसी मी
झुंजतो आहे एकटाच या जिवनाशी..

मित्र आणि सहवासी मी
सोबत चालतो हसत हसत या आयुष्याशी..

एक आनंदी पक्षी मी
उडतो आहे एकटाच नभी..

जीवन असच जगायच असत. .

जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.
अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.
फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.
भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .

श्रावण

ह्या श्रावण मासात..........
ह्या श्रावण मासात


येणार्या झुळूक वार्याबरोबर
फिरनार्या फुलपाखरा बरोबर
नव्याने पालवी फुटलेल्या गवताबरोबर
हरवून जावस वाटणारा हा श्रावण !! १ !!

हे सर हिरव रान
त्यावर आलेली पिकाना फूले
त्यांच्या सुटलेल्या त्या सुगंध वासात
फुलून जावस वाटणारा हा श्रावण !! २ !!

येणार्या पावसाच्या सरी संगती
नागपंचमीच्या पाळण्या संगती
त्याच्याच झोकेत आकाशात
भरारी घ्याविशी वाटणारा हा श्रावण !! ३ !!

फुललेल्या नव्या वनराई सोबत
त्यावर पडलेल्या दवा सोबत
सकाळी सुटलेल्या गुलाबी थंडी सोबत
मनसोक्त रमून जाणारा हा श्रावण !! ४ !!

म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं..
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास..
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण.
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन.
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही.
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली जुहू चौपाटीवर प्रेमीयुगुलांना पहातोना..
जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ
गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही.

मैत्री

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर होईल जीवन अळणी
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री...
अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

.......मी निशब्द....

असंही प्रेम असतं!! mi tar as prem karnya saathi tayar aahe pan jar tumchya najret ashi kon aahe ka ji mazya saathi tayar zaali aahe.
शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार.

मेरा भारत महान..
मेरा भारत महान.
मुलायमचा लाडके..
सिमी अन पाकिस्तान.

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..आम्ही बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का??

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

अजुन काय हवे

एकच चहा, तो पण कटीग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ति पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडुन?

एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रन्गवुन.....
एकच श्रिखन्दाचि वडी, ति पण अर्धि तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवि हासदुन....
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन....
अजुन काय हवे असते आईकडुन?

एकच कथोर नकार स्वेराचाराला, तो पण ह्दयावर दगड थेउन.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगरया आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?

सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?
या सुंदर जीवनात कधी
कधी...पडायच असत प्रेमात कधी कधी...
बघायच असत झुरुन
दुसर्žयासाठी कधी कधी...
पाहताना तिच्याकडेच
दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी...
अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी...
रात्री पहायची असतात
स्वप्ने तिचीच...
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी...
नंतर "जागली होतिस का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी...
मागायचा असतो देवाकडे...
हात तिचा चोरुन कधी कधी...
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी...
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी कधी...
असते रागवायचे लटकेच
"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी...
विरहात तीच्या...
असते रडायचे गुपचुप आतुन
कधी कधी...
पाहुन हात तिचा दुसर्žया हाती...
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी...
पडायच असत प्रेमात कधी कधी...
बघायच असत झुरुन
दुसर्žयासाठी कधी कधी...

एकदा मी प्रेमाला विचारले

एकदा मी प्रेमाला विचारले
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे ?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...


जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...





आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे..

शब्द

शब्द
शब्द

शब्द म्हणजे काय असते ?
ओघळणारा झरा असते
सळसळणारा वारा असते
शब्द म्हणजे असतो डोंगर
कधी सुगंधी माती असते

शब्द म्हणजे प्रेम असते
शब्द म्हणजे माफ़ी असते
शब्द म्हणजे आठवणींची
भरलेली टाकी असते

शब्द कधी असती सुंदर
कधी हृदयास भिडनारे
शब्द असती रडता-रडता हसवणारे
शब्द असती हळूच जग दाखवनारे

शब्द म्हणजे असते न्यान
शब्द म्हणजे असते शान
शब्दामध्येच मोजले जाते
तुझ्या माझ्या अकलेचे परिमाण

शब्द कधी असती प्रेमळ
शब्द कधी बनती कठोर
शब्द कधी असती बोलके
शब्द कधी असती तुटके
शब्दामध्येच सामावली असतात
तुझी माझी सुख-दू:खे

शब्द म्हणजे काय असते ?
खरे सांगू ?
शब्दामध्ये दडलेल्या भावनाशिवाय
शब्द म्हणजे काहीच नसते
आणि हे समजुन घे माझ्या मित्रा
शब्दान्विनाही जग असते .

मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात तरंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी
येथल्या फुलाफुलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरूलतांत सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पा

college

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात...

मैत्रीचा खरा अर्थ

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री ..........

मैत्री - एक कविता

मैत्री - एक कविता
काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात........
सायंकाळी समुद्र किनारी फ़िरायला
ओल्या वाळू वर अलगदपणे
पावलं टाकायला.
खुप मज्जा येते ज्या
वेळी ती ओली वाळू
तळपायांना हळूवार स्पर्श करते.
आवडत मला...
त्याच वाळूवर काही
वेळ बसुन त्या मावळत्या
सुर्याकडे एकटक बघत बसायला.
आवडत मला ...
त्या समद्रात बुडणारया
सुर्याकडे पहात पहात
गेलेले दिवस आठवत बसणे.
आवडत मला...
बुडलेल्या सुर्याला
पाहता पाहता
ऊद्या च्या नविन
किरणांची वाट पाहायला.