Thursday, October 16, 2008

आयुष्य नक्की काय असत?

आयुष्य नक्की काय असतं ?
आयुष्य नक्की काय असतं ?

हासर्या फ़ुलावरचं दव असतं..

नाचर्या मुलाचं नाच असतं..

दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..


आयुष्य नक्की काय असतं,

समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,

किनारा शोधत फ़िरायच असत,

वादळांनी डगमगुन जायचं नसतं.


आयुष्य नक्की काय असत?

ते एक तलम रेशमी वस्त्र असत..

ज्याचे त्यानेच ते विणायच असत

पण अति ताणायच नसत..


आयुष्य नक्की काय असत?

सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत

ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत

गुन्तून मात्र त्यात पडायच नसत
फक्त एक कविता म्हणुन वाचा मनावर घेऊ नका.........
वेगला अर्थ काढू नका...........छान कविता आहे ..........................



मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी,
नाही ग, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती..

पण आहेस तरी नक्की कोण तू माझी,
अवचित या मोहक वळणावर भेटलेली..

गुंफलेस तू धागे विश्वासाचे,
देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे..

केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज..

पण ठाऊक आहे हे दोघांना,
आवडतो आपण एकमेकांना..

घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन,
नाही दुखवत भावनांना..

पाठराखण करतो एकमेकांची,
रोजच उत्सुकता संवादाची..

ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
ना दिलेय मन एकमेकांना आंदण..

पण,बोलायला लागले आहेत डोळे,
मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले..

काय आहे तुझ्या मनात,
जरा बोल तरी शब्दांत..

खुप झालाय मजेशीर हा गुंता,
व्ह्ययलाच हवा आता उलगडा..

होईल का या नात्याची उकल,
एक मात्र जरुर कर..

मित्र 'रहाच' ,बनालिस जरी प्रेयसी,
कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर..